बीडमधील दहशतवाद कधी थांबणार? जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका; अंजली दमानिया यांची मागणी

बीडमधील दहशतवाद कधी थांबणार? जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका; अंजली दमानिया यांची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्येची घटना ताजी असतानाच आष्टी तालुक्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथे ट्रक मालकाने चालकाला डांबून ठेवत अमानुष छळ करत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विकास बनसोडे असे मयत चालकाचे नाव आहे. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील सगळे अधिकारी बदलून टाका, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

माध्यमांशी संवाद साधता अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, राज्यातील कायदा सुव्यवस्था कधी जागेवर परत आणणार, हे मृत्यू कसे थांबवणार, ही दहशत कधी थांबवणार? यावर सरकार कधी चर्चा करणार, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, “आज पुन्हा एक मृत्यू झाला आहे, त्याचे चित्र संतोष देशमुख त्यांच्यासारखीच आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता तरी याबद्दल अधिवेशनात काहीतरी सांगावं.”

अंजली दमानिया म्हणाल्या, “बीडमध्ये जी परिस्थिती झाली आहे, त्यासाठी वेगळ्या प्रकारचा कायदा आणावा, कारण आता हे सगळं हाताबाहेर गेलं आहे. तेथील सगळे अधिकारी बदलून टाका”, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तरूणीचं खेळकर आयुष्य क्षणात उद्ध्वस्त, रेल्वे मंत्र्यांनी सहानुभूती दाखवावी – मुंबई हायकोर्टाची टिप्पणी तरूणीचं खेळकर आयुष्य क्षणात उद्ध्वस्त, रेल्वे मंत्र्यांनी सहानुभूती दाखवावी – मुंबई हायकोर्टाची टिप्पणी
मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मानवी पीडेच्या दुर्मिळ प्रकरणांपैकी एका प्रकरणात सहानुभूतीपूर्वक नुकसान भरपाईचा विचार करण्यास सांगितले आहे. हे प्रकरण...
नवऱ्याने होळी का साजरी केली नाही? विचारणाऱ्यांना स्वरा भास्करचं सडेतोड उत्तर
नाना पाटेकरांच्या चित्रपटाचा ओटीटीवर बोलबाला; भारतात नंबर 1 वर होतोय ट्रेंड
ओव्हरॲक्टिंगचे पैसे कापा.. 16 वर्षांच्या मुलाच्या इशाऱ्यानंतर भडकली मलायका अरोरा, नेटकऱ्यांनी थेट सुनावलं, Video
हिना खानवर किमोथेरपीचे साइड इफेक्ट्स; फोटो पोस्ट करत ट्रोलर्सना सुनावलं
सानिया मिर्झासोबत घटस्फोट, आता शोएब मलिकचं कसं आहे मुलासोबत नातं? ‘मुलाच्या कस्टडीमुळे… ‘
एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक