फडणवीस-अदानींची मध्यरात्री बंद दाराआड दीड तास चर्चा

फडणवीस-अदानींची मध्यरात्री बंद दाराआड दीड तास चर्चा

मुंबईत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हालचाली वाढल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील बाहेर आला नसला तरी मुंबईतील धारावी, गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पांबरोबरच कुर्ला, वरळी डेअरी व अन्य भूखंडांबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारने टीडीआरचे दर मर्यादित ठेवले असले तरी इतर बिल्डर्सना त्यांच्या प्रकल्पांसाठी टीडीआर वापरायचा असेल तर किमान 40 टक्के टीडीआर धारावी प्रकल्पातून म्हणजेच अदानींकडून खरेदी करावा लागणार आहे. त्यावरही चर्चा झाल्याचे कळते. फडणवीस-अदानी यांच्यात दोन तास चर्चा झाली. रात्री दहाच्या सुमारास सागरवर गेलेले अदानी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सागर बंगल्यातून बाहेर पडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले