नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट कराल तर नागडं करून धिंड काढू, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट कराल तर नागडं करून धिंड काढू, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या बद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोन महिला पत्रकांरांना अटक करण्यात आली आहे. यावरून शनिवारी तेलंगणाच्या विधानसभेत गोंधळ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ”जर कुणी नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करेल त्याला नागडं करून त्याची धिंड काढू”, असा इशारा दिला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर भाषण करताना रेवंथ रेड्डी म्हणाले की, ” ऑनलाईन समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे बदनामीकारक पोस्ट टाकल्या जातात ते थांबविण्यासाठी एक कायदा बनायला हवा. तसेच खरे पत्रकार कोण हे देखील जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वृत्तपत्र, वाहिन्या आणि संकेतस्थळांसाठी काम करणारे पत्रकार तसेच अधिकृत पीआर एजन्सीसाठी काम करणाऱ्या पत्रकारांची यादी सरकारकडे असायला हवी. फक्त आणि फक्त त्या पत्रकारांच्याच पोस्ट वगळल्या जातील. त्या व्यतिरिक्त इतर कुणीही पत्रकार असल्याचे दाखवून चुकीच्या बदनामीकारक पोस्ट केल्या तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल”, असे रेवंथ रेड्डी म्हणाले.

”भारत राष्ट्र समिती पक्षाने त्या दोन महिला पत्रकार ज्यांनी माझ्या कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली त्यांच्या अटकेचा निषेध केला. मी आतपर्यंत संयम बाळगून होतो. पण किती वेळ शांत राहायचे. माझ्या घरातील महिलांबाबत चुकीची भाषा वापरल्यावर मी कसा शांत राहू? BRS वाले त्यांच्या आई बहिण बायकोबद्दल असं ऐकून शांत राहतील का? मी त्या सर्वांना पकडेन व त्यांना नागडं करून त्यांची धिंड काढेन. त्यांना माझ्या कुटुंबातील महिलांबाबत असे शब्द वापरायचा हक्क नाही’, असे रेवंथ रेड्डी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन… डोकेदुखीची समस्या होईल दूर, आहारामध्ये ‘या’ पदार्थांचे करा सेवन…
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
550 कोटींची मालक फोटोतील ही लहान मुलगी, एका चित्रपटासाठी घेते 15 कोटी, परिवारात अनेक सुपरस्टार्स
बदलत्या हवामानात फ्लूची समस्या सतावतेय, फक्त ‘या’ छोट्या गोष्टींची घ्या काळजी
तुम्हाला कलिंगड खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का? चला जाणून घेऊया तज्ञांचे मत…
महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Ratnagiri News – आगामी काळात शिवसेनेचे अस्तित्व दाखवूनच देऊ, अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केला विश्वास