शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषिप्रधान म्हणता, लाज वाटली पाहिजे! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना सुनावले

शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषिप्रधान म्हणता, लाज वाटली पाहिजे! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना सुनावले

तुम्हाला शेतकऱ्यांना मारण्यासाठी निवडून दिले का? शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा आमदार-खासदार-मंत्री कुठे असतात, असा सवाल करतानाच शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही आपला देश कृषिप्रधान असल्याचे सांगत का मिरवता, असा संताप आत्महत्या केलेले राज्य पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासमोर व्यक्त केला.

बुलढाणा जिह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे संपन्न झाला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आमदार सुनील कायंदे यांच्यासह वेगवेगळ्या जिह्यांतील शेकडो शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी मनातील संताप व्यक्त करून आमदार, खासदार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची अक्षरशः लाज काढली. पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर आमचा कृषिप्रधान देश काय कामाचा? याची लाज वाटली पाहिजे असे म्हणत, माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा, असे त्यांनी सुनावले.

त्या म्हणाल्या की, माझ्या भावाला हे माहीत होते की, या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिले आहे. देशाला राजकारणी हे कृषिप्रधान म्हणतात, यांना लाज वाटायला पाहिजे की, कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो आणि तेही पाण्यासाठी. माझ्या भावाने पालकमंत्र्यांना वारंवार विनंती केली. मात्र, अशा पालकमंत्र्यांना पालकत्व स्वीकारता येत नसेल तर कशाला पालकत्व स्वीकारतात? त्यांनाही लाज वाटली पाहिजे, असे खडे बोलही सत्यभामा नागरे यांनी सुनावले.

मतदान मागताना शेतकऱ्यांच्या दाराला माती ठेवत नाहीत. आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या आल्या की हे सर्व बेपत्ता होतात. तुम्हाला शेतकऱ्यांना मारण्यासाठी निवडून दिले का असा संताप सत्यभामा यांनी व्यक्त केला.

मंत्र्याची मान खाली

सत्यभामा नागरे या खडे बोल सुनावत होत्या तेव्हा मंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आमदार सुनील कायंदे हे खाली मान घालून बसले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले