पाण्यात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी गेले अन् बुडाले, एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी मृत्यू

पाण्यात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी गेले अन् बुडाले, एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी मृत्यू

म्हैस पाण्यातून बाहेर येईना म्हणून एकामागोमाग पाच मुलं तिला बाहेर काढायला तलावात उतरली. मात्र पाण्यात बुडाल्याने पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार तहसिलअंतर्गत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. सर्व मुलं एकाच कुटुंबातील असून 8 ते 14 वर्षे वयोगटातील होती.

हिंगोरजा कस्बे येथील एका कुटुंबातील पाच मुलं नेहमीप्रमाणे म्हशींना चरायला घेऊन गेले होते. यावेळी घरी परतत असताना एक म्हैस तलावात अडकल्याचे त्यांनी पाहिले. म्हशीला बाहेर काढण्यासाठी सर्व मुलं एकामागोमाग एक तलावात उतरली आणि सर्वजण बुडाले.

घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक, गावकरी आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. रेस्क्यू टीमने सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले