पाण्यात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी गेले अन् बुडाले, एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी मृत्यू
म्हैस पाण्यातून बाहेर येईना म्हणून एकामागोमाग पाच मुलं तिला बाहेर काढायला तलावात उतरली. मात्र पाण्यात बुडाल्याने पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार तहसिलअंतर्गत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. सर्व मुलं एकाच कुटुंबातील असून 8 ते 14 वर्षे वयोगटातील होती.
हिंगोरजा कस्बे येथील एका कुटुंबातील पाच मुलं नेहमीप्रमाणे म्हशींना चरायला घेऊन गेले होते. यावेळी घरी परतत असताना एक म्हैस तलावात अडकल्याचे त्यांनी पाहिले. म्हशीला बाहेर काढण्यासाठी सर्व मुलं एकामागोमाग एक तलावात उतरली आणि सर्वजण बुडाले.
घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक, गावकरी आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. रेस्क्यू टीमने सर्व मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. एकाच कुटुंबातील पाच मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List