मुंबई – गोवा हायवेवर टॅफिकचा ‘शिमगा’, माणगावजवळ 9 किमीच्या रांगा… सात तास लटकंती
मुंबई-गोवा महामार्गावर आज ट्रॅफिकचा अक्षरशः ‘शिमगा’ झाला. होळीचा सण साजरा करून हजारो चाकरमानी मुंबई-ठाण्याच्या दिशेने निघाले खरे… मात्र रखडलेले चौपदरीकरण, त्यातच वाहतूक पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे माणगावजवळ तब्बल आठ ते नऊ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोलाड, नागोठणे तसेच पेणमध्येही अशीच अवस्था होती. त्यामुळे पोलादपूर ते पळस्पे हे 155 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सात तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे टळटळीत उन्हात कोंडी झालेले चाकरमानी घामाच्या धारांमध्ये भिजून गेले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List