डोके फिरू सेन्सॉर बोर्डावर कारवाई करा; नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची मागणी

डोके फिरू सेन्सॉर बोर्डावर कारवाई करा; नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची मागणी

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटात बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरण्यात आल्या आहेत. जेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला तेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या कवितांवर आक्षेप घेतला होता. तसेच त्यांना या नामदेव ढसाळ यांच्या कविता असल्याचे सांगताच त्यांनी ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असा प्रश्न उपस्थित केला होता. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेला प्रश्न पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता नामदेव ढसाळ यांची पत्नी मल्लिका ढसाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मल्लिका ढसाळ यांनी नुकताच एक पत्रपकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सेन्सॉर बोर्डाला चांगेलच सुनावले आहे. ‘थोर पुरुषांचा अपमान टाळण्यासाठी मराठी सिनेमा सेन्सॉर बोर्डवर योग्य व्यक्ती असावे ज्यांना मराठी भाषेचा सन्मान असेल, माहिती असेल’ असे मल्लिका ढसाळ म्हणाल्या.

पुढे मल्लिका यांनी ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाविषयी देखील मोठा खुलासा केला आहे. दिग्दर्शकाने कोणतीही परवानगी न घेता नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. ‘इतकी भयंकर वेळ माझ्यावर आली आहे. हे अत्यंत यानादायी आहे. मराठीचा अपमान आहे. मराठीचा झेंडा जगात लावला आहे तो माणूस कोण असं कसं विचारू शकता. त्या माणसाचे तातडीने निलंबन करावे. अकलेची दिवाळखोरी आहे. गैरफायदा घेण्याचा कोणाला अधिकार नाही. हल्ला बोल सिनेमा माझ्या परवानगीशिवाय केला आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्या आहेत. मी कायदेशीर कारवी करणार’ असे त्या म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले