जलपर्णीने उल्हास नदीचा श्वास कोंडला
कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य, गटाराचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे रायते पुलाजवळील उल्हास नदीत जलपर्णीने हातपाय पसरल्याने नदीपात्राचा श्वास कोंडला आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून उल्हास नदीवर जलपर्णीचा गालिचा पसरला आहे. जलपर्णी काढण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असून प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. जलशुद्धीकरण केंद्रच नाही उन्हाळा सुरू झाला की उल्हास नदी पात्राला जलपर्णी घट्ट विळखा घालते. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. उल्हास नदीच्या काठी आपटी, मांजर्ली, भिसोळ, आणे, कांबा, वरप, म्हारळ आदी गावे आहेत. या गावांना रायते पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र २००५ पासून या योजनेला जलशुद्धीकरण केंद्रच नाही. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी टाकीत सोडण्यात येते. प्रक्रिया न करता पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List