Sangli News – आलिशान मोटारीने 10 वाहनांना उडविले, चालक ताब्यात

Sangli News – आलिशान मोटारीने 10 वाहनांना उडविले, चालक ताब्यात

माधवनगर ते खोतवाडी (ता. मिरज) या मार्गावर शनिवारी रात्री आलिशान चारचाकी वाहनचालकाने ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा थरकाप उडविला. तीन गावांतील 10 वाहनांना उडवत भरधाव वेगाने पळ काढला. तीन गावांच्या लोकांनी पाठलाग करून त्याला खोतवाडी येथे गाठले. शेतात त्याची चारचाकी अडवून धरली. शेकडोने असणाऱ्या नागरिकांच्या जमावाला पोलिसांनी तत्काळ पांगवत चालकाला ताब्यात घेतले.

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील तो चालक असल्याचे समजते. दरम्यान, चार ते पाचजण जखमी झाले आहेत. या घटनेने वाहनधारकांचा थरकाप उडाला होता. गोमेवाडीतील एक तरुण आलिशान चारचाकी घेऊन सांगलीत आला होता. त्याच्यासोबत गाडीत एक महिलादेखील होती. तो चारचाकी घेऊन माधवनगर ते बुधगाव रोडवरून निघाला होता. यावेळी ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा प्रकार घडला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले