‘म्हाडा’त हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार, सर्वाधिक गर्दीच्या विभागात ऑनलाइन सुविधा देणार

‘म्हाडा’त हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार, सर्वाधिक गर्दीच्या विभागात ऑनलाइन सुविधा देणार

>>मंगेश दराडे

म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या रहिवाशांची प्राधिकरण आता सविस्तर माहिती गोळा करणार आहे. त्यामुळे मुख्यालयातील कोणत्या विभागात कामानिमित्त दिवसाला किती रहिवासी येतात याची माहिती म्हाडाला उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भविष्यात त्या विभागातील सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या इमारतीत मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दिवसाला विविध कामानिमित्त चार ते पाच हजार रहिवासी म्हाडा मुख्यालयाला भेट देतात. एकाच कामासाठी रहिवाशांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे कार्यालयावर ताण येतोच, शिवाय हे रहिवासी मुख्यालयात येताना बस, रेल्वे, मेट्रो अशा सार्वजनिक सुविधांचा वापर करत असल्याने या सुविधांवरदेखील ताण येतो. रहिवाशांनी पायपीट कमी व्हावी आणि त्यांना घरबसल्या ऑनलाइन सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडाने आता व्हिजिटर प्रोफायलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरक्षा रक्षकांना टॅब देणार

मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रहिवाशांकडून त्यांना कोणत्या विभागात आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे, अशी माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षकांना टॅब देण्यात येणार आहे. तीन ते चार महिने ही माहिती गोळा केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या विभागात कामासाठी रहिवाशांची सर्वाधिक गर्दी होते याची माहिती प्राधिकरणाला मिळणार आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी त्या विभागातील सेवा ऑनलाइन  उपलब्ध करून देता येतील का, त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, अशी महिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीडमध्ये चाललंय काय? संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना, अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप बीडमध्ये चाललंय काय? संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना, अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. बीडमध्ये चाललंय तरी काय?...
लोकांना तू पर्सनल लाइफमध्ये कसा आहेस..; अक्षय केळकरसाठी समृद्धी केळकरची पोस्ट चर्चेत
बघतोच तुला कोण…; होळी पार्टीत नशेत धूत असलेल्या कोस्टारने अभिनेत्रीसोबत केले चुकीचे कृत्य
गौरीसोबतचं अफेअर मीडियापासून कसं लपवलं? खुद्द आमिर खाननेच केला खुलासा
देवमाणूस परत येतोय, ‘देवमाणूस 3’ चा प्रोमो, किरण गायकवाड नसणार?
Video: घटस्फोटीत अभिनेता पडला प्रेमात, गर्लफ्रेंडला नको तिकडे रंग लावताना पाहून संतापले नेटकरी
Maharashtra Legislative Council Election : भाजपच्या उमेदवारांची नावं ठरली, माधव भंडारींचा पत्ता पुन्हा कट