आर्थिक गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई

आर्थिक गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई

शेअर मार्केट ट्रेडिंगऐवजी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा आणि चांगला नफा कमवा अशा प्रकारे बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर नेहरूनगर पोलिसांनी कारवाई केली. अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या  मुख्य आरोपींसोबत सोहेल सोळंकी (29) हादेखील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. चुनाभट्टी येथील जोगानी इंडस्ट्रीयलमधील एका गाळय़ात बोगस कॉल सेंटर थाटले असून तेथून नागरिकांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. मोठय़ा नफ्याचे आमिष दाखवून पद्धतशीर नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची खबर नेहरू नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि काळे, पाटील, उपनिरीक्षक डमरे, गोल्हार, टेंभे व पथकाने त्या कॉल सेंटरवर छापा टाकून बोगस कॉल सेंटरमधील फसवणूक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आम्ही जायचं कुठं? नाट्यगृहांसाठी बनवलेल्या रंगयात्रा ॲपविरोधात मराठी कलाकाराचं आंदोलन आम्ही जायचं कुठं? नाट्यगृहांसाठी बनवलेल्या रंगयात्रा ॲपविरोधात मराठी कलाकाराचं आंदोलन
पुण्यात नाट्यगृह आरक्षण ऑनलाइन बुकिंग ॲपविरोधात आंदोलन करण्यात आलं. नाट्यनिर्माते तसंच नाट्य व्यवस्थापक, तंत्रज्ञ, रंगकर्मी आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने...
60 वर्षांचा आमिर खान एका मुलाची आई असलेल्या गौरीच्या प्रेमात का पडला? स्वत:च सांगितलं कारण
सलमानने मला काचेवर आदळलं अन् माफीसुद्धा मागितली नाही..; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
‘तेव्हा ती माझी सून नव्हती…..’ ऐश्वर्या राय सोबत केलेल्या ‘आयटम सॉंग’वर अमिताभ बच्चन स्पष्टच बोलले
ए. आर. रेहमान यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
लोकांच्या पोटात अन्न नाही आणि हे हिंदुत्ववाद करत बसलेयत, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका
चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात