पाकिस्तानी विमानाचे चाक हवेतच गायब झाल्याने खळबळ

पाकिस्तानी विमानाचे चाक हवेतच गायब झाल्याने खळबळ

पाकिस्तानी विमानाचे एक चाक हवेतच गायब झाल्याने एकच खळबळ माजली. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानाने उड्डाण केले, मात्र एक चाक गायब झाल्याचे पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला. कराचीहून लाहोरला जात असलेले पीके-306 या विमानाचे एक चाक गायब झाले की चोरी झाली याची चौकशी केली जात आहे. लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली असता मागचे एक चाक गायब होते.

विमानाने कराचीहून उड्डाण केले तेव्हा विमानाची सर्व चाके चांगल्या स्थितीत होती, मात्र लाहोरमध्ये विमान उतरल्यावर लाहोरच्या एअर ट्रफिक पंट्रोलला एक चाक नसल्याची माहिती मिळाली. तसेच कराची विमानतळावर चाकाच्या कवचाचा काही भाग जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, कराचीच्या धावपट्टीदरम्यान ही घटना घडली असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले