रंगपंचमी साजरी करून घरी जात असताना लिफ्ट बंद पडली, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर 10 महिलांची सुखरुप सुटका

रंगपंचमी साजरी करून घरी जात असताना लिफ्ट बंद पडली, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर 10 महिलांची सुखरुप सुटका

रंगपंचमी साजरी करून घरी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडल्याने 10 महिला आत अडकल्या. अग्नीशमन दलाने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर महिलांची सुखरुप सुटका केली. अहमदाबादमधील केबी रॉयल रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये ही घटना घडली.

रंगपंचमीच्या दिवशी 30 ते 40 वयोगटातील 10 महिला इमारतीखाली सेलिब्रेशन करून लिफ्टने आपापल्या घरी परतत होत्या. यादरम्यान लिफ्टच्या रिलीजिंग व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये बंद पडली.

लिफ्ट कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांचे निष्फळ ठरले. अखेर अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तीन तास अथक प्रयत्न करत आरसीसी भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व 10 महिलांची सुटका केली. सर्व महिलांनी अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले