सोने तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

सोने तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सोने तस्करी प्रकरणी दोन कारवाई करून चौघांना अटक केली. त्यात तीन खासगी विमानतळ कर्मचाऱयांचा समावेश आहे. प्रदीप पवार, मोहम्मद नागोरी, अंशू गुप्ता, सय्यद मेहताब अशी त्यांची नावे आहेत. एआययूने जप्त केलेल्या सोन्याच्या पावडरची किंमत सुमारे 3 कोटी 36 लाख रुपये इतकी आहे. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआययूचे पथक गस्त करत होते. तेव्हा एआययूच्या अधिकाऱ्याने प्रदीपला ताब्यात घेतले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला तपासणीसाठी नेले. त्याच्याकडे सोन्याची पावडर मिळून आली. त्याने ती पावडर पॅण्टमध्ये लपवली होती. त्याला ते सोन्याची पावडर असलेले दोन पाऊच अज्ञात प्रवाशाने दिले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले