पैठणचा पाणीपुरवठा खंडित, नाथसागरच्या पायथ्याशी आजपासून पाणीबाणी

पैठणचा पाणीपुरवठा खंडित, नाथसागरच्या पायथ्याशी आजपासून पाणीबाणी

पैठण नगर परिषदेने 3 कोटी 36 रुपयांची थकीत पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे आज जायकवाडी धरणावरील पंपहाऊसला टाळे ठोकण्यात आले. पाणीपुरवठा खंडित झाल्याने उद्यापासून नळांना पाणी येणार नाही. त्यामुळे उसळणाऱ्या संभाव्य जनक्षोभास न.प. प्रशासन जबाबदार राहील.’ असे लेखी पत्र देऊन ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहायक अधीक्षक अभियंता दीपक डोंगरे यांना दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

नगर परिषदेकडे वारंवार मागणी करूनही पैसे जमा न केल्याने ही कठोर कारवाई करावी लागली आहे. यापूर्वी 12 स्मरणपत्रे पाठवण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. नाथषष्ठी यात्रौत्सव पार पडल्यानंतर 25 मार्च रोजी थोडीफार रक्कम जमा केली जाईल. असे लेखी पत्र नगर परिषदेने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांना पाठवले होते. यानंतर सतत पाठपुरावा करण्यात येत होता. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी तर आज मोबाईलच स्विच ऑफ करून ठेवल्याचे दिसून आले.

दरम्यान जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिका, गंगापूर न.प. व संत एकनाथ साखर कारखाना यांच्याकडेही कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी थकलेली आहे. वरील संस्थांनी विशिष्ट रकमा भरून थकीत बाकी कमी केली. त्यामुळे त्यांना कारवाईतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी जलसंपदा विभागाचे पथक जायकवाडी प्रकल्पावर असलेल्या पैठणच्या पंपहाऊसवर पोहोचले. थेट टाळे ठोकून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. पैठण शहरात यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला जलसंपदा नव्हे तर नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी लेखी नोटीस देण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही…संजय राऊतांनी हाणला टोला, अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य Sanjay Raut : शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही…संजय राऊतांनी हाणला टोला, अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य
उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू...
मुस्लीम असूनही सतत केदारनाथला का जाते? सारा अली खानचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
भगवा पट्टा, आतमध्ये राम मंदिर.. सलमानच्या हातातील घड्याळ पाहून चिडले मौलाना
WITT 2025: कमी कालावधीत मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशाबद्दल विजय देवरकोंडा म्हणाला…
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुण्यात घडले दर्शन, ब्राह्मण व्यक्तीवर मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्याने विधिवत अंत्यसंस्कार
‘हे’ अत्यंत चिल्लर लोकं, संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात
सोलापूर बाजार समितीची निवडणूक होणार चुरशीची; 18 जागांसाठी 479 जणांचे अर्ज, शेवटच्या दिवशी 270 अर्ज दाखल