IPL 2025 – रजत पाटीदारच्या RCB ने 17 वर्षांनी ‘चेपॉक किल्ला’ भेदला, चेन्नईचा 50 धावांनी उडवला धुव्वा
एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या CSK विरुद्ध RCB सामन्यात आरसीबीने चेन्नईचा धुव्वा उडवत 17 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. आरसीबीने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची गाडी अक्षरश: रुळावरून घसरली. सलामीला आलेल्या रचिन रविंद्र (41 धावा) व्यतिरिक्त इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने चेन्नईला 8 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह आरसीबीने हंगामातील दुसरा विजय साजरा केला आणि 2008 नंतर चेन्नईला चेन्नईमध्येच धुळ चारण्याची किमया साधली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List