मोदीजी, सांगा त्या सौगातचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

गुजरातमधील जातीय दंगलीतून, हिंदू-मुस्लीम दंग्यातून स्वतःचे नेतृत्व पुढे आणणारा माणूस जर आता सौगातसारख्या गोष्टी करत असेल तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देणार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणार, पेट्रोल 40 रुपये तर डिझेल 35 रुपये करू, अशा घोषणांच्या सौगातीचे मोदीजी काय झाले, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पंतप्रधानांच्यावतीने ईदनिमित्ताने मुस्लीम कुटुंबांच्या घरी जाऊन शेवया, खजूर व इतर सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या भेटवस्तूंची सौगात वाटली जाणार आहे. या ‘सौगात-ए-मोदी’वर सपकाळ यांनी सडकून टीका केली आहे. हिंदू-मुस्लीम दंग्यातून पुढे आलेले मोदीजींना देशवासीयांबरोबर केलेल्या विविध घोषणांच्या सौगातीचा विसर पडला आहे. हे म्हणजे ‘सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली’ अशा म्हणीप्रमाणे मोदीजी यांचे वागणे आहे. मात्र मोदीजी सोयीस्करपणे त्यांनी केलेल्या घोषणांची सौगात विसरले असले तरी या सौगातीची संपूर्ण देश वाट पाहत आहे, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List