मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीत आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीत आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील ईडी कार्यालयात रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीचे कार्यालयही याच इमारतीत आहे. रात्री अडीच वाजता अग्निशमन दलाला आग लागल्याबाबत फोन आला.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

अनेक मोठ्या राजकारणी आणि व्यावसायिकांविरुद्धच्या खटल्यांच्या चौकशीशी संबंधित कागदपत्रे या कार्यालयात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 2.31 वाजता अग्निशमन दलाला करिमभोय रोडवरील ग्रँड हॉटेलजवळील बहुमजली कैसर-ए-हिंद इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने सांगितले की, पहाटे 3.30 च्या सुमारास आग लेव्हल-2 पर्यंत वाढली होती, ती सामान्यतः मोठी आग मानली जाते.

महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित होती. घटनास्थळी आठ अग्निशमन इंजिन, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, एक श्वासोच्छवास उपकरणे व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक जलद प्रतिसाद वाहन आणि 108 सेवेतील एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लोकल ट्रेन लेट.. मग बोटीने कामाला जा, मुंबईत धावणार वॉटर टॅक्सी, कोच्ची करणार मदत लोकल ट्रेन लेट.. मग बोटीने कामाला जा, मुंबईत धावणार वॉटर टॅक्सी, कोच्ची करणार मदत
मुंबई्च्या लोकल ट्रेनने कामाला जाण्याचा अवघड टास्क केवळ मुंबईकरांना ठावूक असतो.कारण मुंबईतील लोकल ट्रेन एक मिनिट जरी लेट झाली तर...
Pahalgam Terror Attack: विजय देवरकोंडा संताप व्यक्त करत म्हणाला, ‘पाकिस्तानी लोकांना सर्वात आधी…’
‘काश्मीर आमचं आहे आम्ही येणारच…’ पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेता थेट काश्मीरमध्ये, दाखवली तिथली परिस्थिती
पहलगाम हल्ल्याच्या 5 दिवसांनीच अतुल कुलकर्णी पोहोचला काश्मीरमध्ये; पाठ फिरवणाऱ्यांना खास आवाहन
“मी या जगातील सर्वांत बेकार व्यक्ती”, असं का म्हणाली आमिर खानची लेक?
weightloss tips: दहीमध्ये ‘हे’ 2 पदार्थ मिसळून खाल्ल्यामुळे वजन होईल झटपट कमी…
राज्यात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा, मुख्यमंत्री फडणवीसांना काढला खोडून