कोई गार्डन मै नही घूमेगा… रोहित शर्माने सांगितला तेव्हाचा किस्सा

कोई गार्डन मै नही घूमेगा… रोहित शर्माने सांगितला तेव्हाचा किस्सा

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना पार पडला होता. सामना सुरू असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंना उद्देशून ‘कोई गार्डन मैं नहीं घूमेगा’ अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. स्टंपमधील माईकमध्ये रोहित शर्माचं हे वक्तव्य रेकॉर्ड झाल्यामुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. आजही यावर अनेक मीम्स तयार केल्या जात आहेत. त्या वक्तव्याबद्दल रोहित शर्माने आपली भुमिका जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केली आहे.

जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, विशाखापट्टणमध्ये सामना होता. मी पाहिलं की खेळाडू गार्डनमध्ये फिरत असल्यासारखे फिरत होते. सामना खूप महत्त्वाचा होता आणि आम्हाला जिंकायचा होता. त्यामुळे सकाळीच मी खेळाडूंना सांगितलं होतं की, आपल्याला आणखी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पण, ते सर्व निवांत होते. कोणीही फिल्डवर पळताना दिसतं नव्हतं. पहिले दोन-तीन ओव्हर मी पाहून घेतलं आणि त्यानंतर बोललो की तुम्ही अशा पद्धतीने क्रिकेट नाही खेळू शकतं. फलंदाजांनी चांगली भागी केली होती, मी विकेट मिळवण्यासाठी उत्सुक होतो. अशा वेळी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असतात. परंतु तेव्हा प्रत्येकजण स्वत:मद्ये व्यस्त असल्याचे मी पाहिलं आणि ते मला आवडलं नाही, असे रोहित म्हणाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान 2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु...
विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?
‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
उद्धव आणि राज यांची युती होणार का?…राजकीय नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रीया…
महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?, उद्धव ठाकरे कडाडले