ठाणे पालिकेत राष्ट्रवादीलाही भरवायचा आहे जनता दरबार, शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना पत्र

ठाणे पालिकेत राष्ट्रवादीलाही भरवायचा आहे जनता दरबार, शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना पत्र

जनता दरबारावरून ठाण्यात महायुतीमध्ये आधीच झोंबाझोंबी सुरू असताना आता या वादात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उडी मारली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा जनता दरबाराची हाक दिल्यानंतर झोप उडालेल्या मिंधे गटाने महापालिका मुख्यालयात जनसंवाद सुरू केला. मुळात नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकीय राजवटीत मिंधे गटाला पालिकेतील सभागृह देण्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, ठाणे पालिकेत आता राष्ट्रवादीलाही जनता दरबार भरवायचा असून शरदचंद्र पवार पक्षाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवत मोफत सभागृह मिळावे अशी मागणी केली आहे.

गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबाराची सुरुवात केली. याला समांतर आमदार संजय केळकर यांनी जनसंवाद तर मिंध्यांनी थेट पालिकेत जनता दरबार सुरू केला. पालिका मुख्यालयात राजकीय पक्षांचे दरबार चालतात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत आम्हालाही जनता दरबार भरवायचा असल्याचे सांगत ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृहाची मागणी केली आहे. या मागणीमुळे जनता दरबारावरून वातावरण तापणार आहे.

‘मिंधे गटाला पालिकेत दरबाराची परवानगी कशी?

सध्या प्रशासकीय राजवट असताना राजकीय लोकांना ठाणे पालिकेत जनता दरबार भरवण्याची परवानगी कशी दिली? पालिका प्रशासनाने राजकीय पक्षांना जागा भाड्याने देण्यासाठी किती रक्कम आकारली आहे का? नसेल तर मलाही जनता दरबारासाठी मोफत सभागृह मिळावे, अन्यथा मिंधे गटाला सभागृह उपलब्ध करून देऊ नये.

योगेश मुंधरा (सामाजिक कार्यकर्ते)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म