‘फुले’वरून ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान, अनुराग कश्यपनं मागितली जाहीर माफी; म्हणाला…
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. या चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे प्रदर्शनाची तारखही पुढे ढकलण्यात आली होती. यावरून मोठा वाद उफाळला होता. दिग्गज दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही या वादात उडी घेत रोखठोक प्रतिक्रिया दिली होती.
हे वाचा – जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला
अनुराग कश्यप याने बाह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका झाली. सोशल मीडियावरून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमक्याही दिल्या जात होत्या. तसेच याप्रकरणी मुंबईत एफआयआरही दाखल करण्यात आला होती. यानंतर आता अनुराग कश्यप याने एक पोस्ट शेअर करत आपल्या वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List