‘लिव्हिंग विल’ कागदपत्रासाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, हायकोर्टाचे सरकारला आदेश

‘लिव्हिंग विल’ कागदपत्रासाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, हायकोर्टाचे सरकारला आदेश

वैद्यकीय उपचार कसे केले जावेत किंवा अवयवदान करण्याबाबतचे इच्छापत्र म्हणजेच लिव्हिंग विल करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी योग्य ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यास उदासीन असलेल्या राज्य सरकारच्या कारभारावर न्यायालयाने आज नाराजी व्यक्त केली तसेच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने येत्या चार महिन्यांत यंत्रणा तयार करण्याचे आदेश सरकारला दिले.

वैद्यकीय उपचार कसे केले जावेत किंवा अवयवदान करण्याबाबतचे इच्छापत्र म्हणजेच लिव्हिंग विल करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी योग्य ती यंत्रणा उपलब्ध करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाने 24 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी डॉ. निखिल दातार व अन्य दोघांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी सरकारी वकील नेहा भिडे यांनी खंडपीठाला माहिती देताना सांगितले की, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, शहरी आणि ग्रामीण विकास विभागांनी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. सन्मानाने मरण्याची इच्छा असलेल्या नागरिकांचे लिव्हिंग विल प्राप्त करण्यासाठी आणि ती जतन करण्यासाठी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.

लिव्हिंग विल जलदगतीने परत मिळवण्यासाठी सरकारकडून एक यंत्रणा तयार केली जाईल. ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी करण्यासाठी सरकार एक वेब पोर्टल सुरू करत असून अधिकाऱ्यांच्या एसओपीसाठी जीआर काढण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भिडे यांनी दिली. खंडपीठाने या माहितीनंतर येत्या चार महिन्यांत योग्य ती यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा