Aditya Thackeray News : पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय, आदित्य ठाकरेंची माहिती

आम्हाला पद महत्वाचं नाही तर राज्याचं हित महत्वाचं आहे, असं विधान शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आज ते सत्तेत आहे, उद्या आम्हीही सत्तेत येऊ, त्यावेळी ते विरोधीपक्ष पदासाठी भांडत राहतील, असंही आदित्य ठाकरेंनी म्हंटलं. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगणार आहे. त्याच अनुषंगाने आज शिवसेना उबाठा गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना उबाठाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खुर्ची आणि जागेची पदं ही येत जात असतात. आम्हाला केवळ राज्याचं हित महत्वाचं वाटतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. तसंच आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 20 पर्यटक जखमी शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 20 पर्यटक जखमी
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक शिवभक्त तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर गर्दी केली होती. त्याचवेळी शिवाई देवी मंदिर...
देहूनगरीत उदंड भाविकांच्या साक्षीने रंगला बीज सोहळा
विरोधी पक्षात आयुष्य काढेन, पण नैतिकता सोडणार नाही; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
Nagar News – श्रीगोंदाजवळ तरुणाची हत्या, अहिल्यानगर हादरले!
Kolhapur News – ईपीएफ पेन्शनधारकांचा कोल्हापूरमध्ये मोर्चा
Sangli News – आलिशान मोटारीने 10 वाहनांना उडविले, चालक ताब्यात
Satara News – जावळी तालुक्यात वणव्यात दोन आराम बस पेटल्या