आजचे अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका, हायकोर्टाने राज्य शासनाला बजावले

आजचे अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका, हायकोर्टाने राज्य शासनाला बजावले

मुंबईतील झोपडय़ांसारखा पसारा जगात कुठे नाही. हे कुठे तरी थांबायला हवे. त्यासाठी आजचे अतिक्रमण उद्याच्या झोपडय़ा होऊ देऊ नका, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाला बजावले. आफ्रिकन देशात झोपडय़ा आहेत, असे अॅड. गायत्री सिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तेथे झोपडय़ा असल्या तरी मुंबईसारखी परिस्थिती त्या ठिकाणी नक्कीच नसेल, असे न्यायालयाने नमूद केले.

2011 ही झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी डेडलाईन ठरवण्यात आली. तरीही झोपडय़ा वाढतच गेल्या. झोपडय़ांची व्याप्ती कुठे तरी थांबायला हवी. महापालिका, म्हाडा किंवा अन्य प्रशासनांचे जे भूखंड मुंबईत शिल्लक आहेत त्यांचे तरी संरक्षण करायला हवे. अन्यथा या भूखंडावरदेखील झोपडय़ा उभ्या राहतील. उद्या त्यांचादेखील विकास करावा लागेल. हे टाळायचे असल्यास आताच उपाययोजना करायला हव्यात, असे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने नोंदवले. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास कायद्याचा आढावा घेऊन त्यात काही बदल करावा का, याची चाचपणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले आहेत. त्यानुसार या कायद्याचा आढावा घेण्यासाठी सुनावणी सुरू आहे.

प्रकल्पबाधितांच्या कोणीच वाली नसतो

प्रकल्पबाधितांसाठी म्हाडा व एमएमआरडीएने बांधलेल्या इमारतींना कोणीच वाली नसतो. या इमारतीत राहणाऱ्यांना सोसायटी करता येत नाही. परिणामी या इमारतींची डागडुजी वर्षानुवर्षे होत नाही. प्रशासनाकडून त्यासाठी पुरेसा निधी दिला जात नाही. अशा इमारतींसंदर्भात योग्य तो निर्णय झाला पाहिजे, अशी विनंती अॅड. सिंग यांनी केली.

मुंबईत जागा शिल्लक राहिलेली नाही

झोपडय़ांचे पुनर्वसन त्यांच्या दोन किमी अंतराच्या परिघातच व्हायला हवे, असे कायदा सांगतो. मात्र मुंबईतील झोपडपट्टीधारकांना उपनगरात घरे दिली जातात, असे अॅड. सिंग यांनी निदर्शनास आणले. असे कायदे व्हायलाच नकोत, मुंबईत पुनर्वसनासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. कफ परेड येथील झोपडय़ांचे दोन किमी अंतरावर कसे पुनर्वसन करणार, असा सवाल खंडपीठाने केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा