सावधान…! पुढील आठवडाभर देशभरात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

सावधान…! पुढील आठवडाभर देशभरात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळीमुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आता अवकाळीचे सावट दूर झाले असून हवामान खात्याने पुढील आठवड्याभरासाठी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. बदललेल्या हवामानामुळे देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून काही राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहाणार असून महाराष्ट्रातही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूरला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट हवामान राहील. तसेच मुंबई, उपनगरे, ठाणे, कोकण या भागात आर्द्रता वाढणार असल्याने उकाड्यात वाढ होणार आहे. राज्यात अनेक भागात सरासरी तापमान 40 अंशांच्या पार जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने राजधानी दिल्लीतही उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. पुढील सहा दिवस दिल्लीत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे आणि या काळात तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचू शकते. पुढील सहा दिवसांत दिल्लीसह देशभरात तीव्र उष्णता जाणवेल आणि तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दक्षिण हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर दिसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत इतक्या चिडल्या जया बच्चन, थेट महिलेचा हात पकडला अन्.. मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत इतक्या चिडल्या जया बच्चन, थेट महिलेचा हात पकडला अन्..
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन नेहमीच त्यांच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतात. पापाराझी आणि माध्यमांसमोर त्यांना अनेकदा चिडताना पाहिलं गेलंय....
अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांनाही मालमत्तेत हक्क, हायकोर्टाचा निर्वाळा
मुस्लिम आरक्षणाविरोधात कर्नाटक भाजपचे 16 दिवस आंदोलन 
चित्रपटांच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेची 40 लाखांची कमाई, निर्मात्यांची सीएसएमटी, आपटा स्थानकाला सर्वाधिक पसंती
महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थान तापला; 21 शहरांमध्ये तापमान 41 अंशांवर पोहचले
मालेगाव बाम्बस्फोट खटला विशेष न्यायाधीशाची बदली
रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय महापूजा व्हावी; शिवसेनेची मागणी