हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला तर धारावीत संघर्ष पेटेल! शिवसेनेचा राज्य सरकारला इशारा

हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला तर धारावीत संघर्ष पेटेल! शिवसेनेचा राज्य सरकारला इशारा

धारावीकर विकासाच्या आड येणार नाहीत, मात्र विकासाच्या नावाखाली कित्येक वर्षांपासून धारावीत राहत असलेल्या हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा उद्योग सुरू आहे. अशा प्रकारचा प्रयत्न याआधी कोणत्याही सरकारने केलेला नाही, मात्र हे राज्य सरकार धारावीतील हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. असा प्रयत्न जर होत असेल तर धारावीत संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, जोपर्यंत 500 चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि अदानीला धारावीकर अजिबात सहकार्य करणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

धारावीमधील बडी मशिदजवळ धारावी बचाव आंदोलन आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य सभेला अनिल देसाई यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. धारावीत किती हजार लोकांना घरे देणार, घरे किती फुटांची राहणार याचा मास्टर प्लॅन, नकाशा दाखवा आणि हॉस्पिटल, रस्ते, उद्यान, शाळा, कॉलेज कोठे असणार हेही अदानी कंपनीने धारावीतील लोकांना प्रोजेक्टरवर दाखवा, असे आव्हानही अनिल देसाई यांनी अदानी कंपनीला दिले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष वामन मेश्राम, जावेद अहमद, प्रभाकरन, पूनम मोहित, पॉल राफे, तेग बहाद्दूर, आदम जाला, किरण सावंत, अॅड. विद्या त्रिरत्ने, अनिल माने, कमालभाई यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, आम आदमी पक्षांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हजारो धारावीवर उपस्थित होते.

धारावी मुंबईचे काळीज

धारावीत सात रेल्वे स्थानके आहेत. धारावीतून संपूर्ण मुंबईत जाण्यासाठी धारावी हे महत्त्वाचे केंद्र आहे. अशी ही धारावी मुंबईचे काळीज असून ते पळवण्याचे काम अदानी करत आहे. धारावीतील मूळ 90 टक्के लोकांना इथून हुसकावून केवळ 10 टक्के धारावीकरांना येथे ठेवण्याचे षड्यंत्र अदानीने रचले आहे, मात्र आम्ही हे षड्यंत्र हाणून पाडू, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबूराव माने यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
चेंबूर येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली...
वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार – भाजपा नेत्याची जहरी टीका, महायुतीतच कलह
वय 44 वर्षे, 2 मुलांची आई, पण भल्याभल्या अभिनेत्रींना टाकते मागे; ‘ही’ ग्लॅमरस हिरोईन आहे तरी कोण?
चेंबूरमध्ये बिल्डरच्या कारवर गोळीबार, एक जण जखमी
IPL 2025 – राजस्थानला 58 धावांनी धुळ चारत गुजरातने मारला विजयी चौकार, पहिला क्रमांक पटकावला
सुप्रिया सुळेंचं रस्त्यासाठी उपोषण, अजितदादा नेमकं काय म्हणाले
40 हजार रुपयांसाठी महिलेचा मृतदेह 6 तास अडवून ठेवला,आंदोलनाचा इशारा देताच,काय घडले पाहा ?