सलमानने सांगितलं 33-31 वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत काम करण्यामागचं खरं कारण

सलमानने सांगितलं 33-31 वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत काम करण्यामागचं खरं कारण

अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या दोघांच्या वयात 31 वर्षांचं अंतर आहे. याबद्दल सलमानने ट्रेलर लाँचदरम्यान प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर अनेकांनी ‘भाईजान’ला ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा सलमान कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. यामागचं कारण त्याने स्पष्ट केलंय. त्याचसोबत भविष्यात अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरसारख्या कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बुधवारच्या पत्रकार परिषदेत सलमान म्हणाला, “मला भविष्यात जरी अनन्या पांडे किंवा जान्हवी कपूरसोबत काम करायची इच्छा असेल तरी आता लोकांना माझ्यासाठी ते कठीण बनवून ठेवलंय. कारण पुन्हा ते वयातील अंतराचा मुद्दा उपस्थित करतात. मी त्यांच्यासोबत या विचाराने काम करततो की त्यामुळे त्यांना एक चांगली संधी मिळेल. त्यांच्या करिअरमध्ये त्याचा फायदा होईल. परंतु लोक काय विचार करतात हे मला माहीत नाही. मी तर त्यांच्या भल्याचाच विचार करतोय. पण ठीक आहे, एके दिवशी मी त्या दोघींसोबत काम नक्की करेन.” सलमानपेक्षा अनन्या वयाने 33 वर्षांनी तर जान्हवी 31 वर्षांनी लहान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान 59 वर्षांचा असून ‘सिकंदर’मध्ये त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी रश्मिका 28 वर्षांची आहे. या दोघांच्या वयात 31 वर्षांचं अंतर आहे. त्यावरून सवाल केला असता सलमान म्हणाला होता, “जर हिरोइनला काही समस्या नाही, हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाही, तर मग तुम्हाला का समस्या आहे? जेव्हा तिचं लग्न होईल, तिला मुलगी होईल तेव्हा मी तिच्यासोबतही काम करेन. आईची परवानगी तर मिळेलच ना?” यावरून प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने सलमानवर टीकासुद्धा केली होती. ‘हिरोईन और हिरोईन के ‘बाप’ को कोई प्रॉब्लेम नहीं है.. तो जब इनकी शादी हो जाएगी आणि..’परवानगी’ अशी कचऱ्यासारखी प्रतिक्रिया देणाऱ्या, पुरुषत्वाची आणि पितृसत्ताकाची विषारी मानसिकता ठेवणाऱ्या भाईला हे कळत नाही का, की भारत बदलला आहे?’ असं ट्विट सोनाने केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam :  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले? Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत
इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर
सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले