प्रदूषण नियंत्रण महामंडळ कुठे आहे? अदानी व्हेंचर्स कंपनीतील स्फोटाची तज्ज्ञांकडून चौकशी

प्रदूषण नियंत्रण महामंडळ कुठे आहे? अदानी व्हेंचर्स कंपनीतील स्फोटाची तज्ज्ञांकडून चौकशी

उद्योगपती गौतम अदानी यांच्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड या कंपनीतील स्फोटाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात येत आहे. संबंधित तज्ज्ञांच्या अहवालानंतर योग्य ती पावले उचलण्यात येतील असा दावा व्यवस्थापनाने केला आहे. दरम्यान, ही चौकशी कंपनीतील तज्ज्ञ करणार असून प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्याची दखल का घेतली नाही, असा सवाल उरणवासीयांनी केला आहे.

उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीच्या हद्दीत इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी असून बुधवारी संध्याकाळी नाफ्ताच्या टाकीची दुरुस्ती व सफाई सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. त्यात रोहित सरगर हे अभियंता जखमी झाले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

कोणाची मेहेरबानी?
कंपनीत स्फोट किंवा आगीची घटना घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धाव घेऊन चौकशी करतात. पोलीसही स्वतंत्रपणे अशा घटनांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतात. मग अदानी यांच्या कंपनीत स्फोट झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकारी का फिरकला नाही, असा प्रश्न धुतूमवासीयांना पडला आहे. या कंपनीवर सरकारची मेहेरबानी आहे काय असेही बोलले जाते. दरम्यान, अदानी व्हेंचर्स कंपनीने आज प्रसिद्धीपत्रक काढून तज्ज्ञांकडून चौकशी सुरू केली असल्याची सारवासारव केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा