डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका; कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा अमेरिकेवर हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका; कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा अमेरिकेवर हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक धोरण आणि टॅरिफ धोरणांमुळे जगभरात अस्वस्थता पसरली आहे. आता याच मुद्द्यावर कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत, असेही ते म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे परिणाम जगभरात दिसत असताना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कॅनडामधील निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर टॅरिफ वॉरचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. 28 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कार्नी यांनी हे विधान केले आहे. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाची अर्थव्यवस्था उभारण्यासाठी प्रांत आणि प्रदेशांमधील सहकार्य महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी जोर दिला आहे.

जस्टिन ट्रूडो यांच्याकडून 14 मार्च रोजी पदभार स्वीकारल्यानंतर कार्नी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, सध्याच्या टॅरिफ वॉरमुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. टॅरिफ युद्ध आणि कॅनडाबाबतचे अमेरिकेचे टॅरिफ धोरण यातून मार्ग काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ट्रूडोच्या नेतृत्वाखालील लिबरल्सच्या कारकिर्दीत दशकभराच्या कमकुवत आर्थिक कामगिरीमुळे कॅनडा अमेरिकेच्या शत्रुत्वाच्या व्यापार धोरणांना बळी पडला, असेही ते म्हणाले.

वॉशिंग्टनने आयात शुल्क काढून टाकेपर्यंत कॅनडामधील 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या आयातीवरील परस्पर शुल्क कायम राहील. डॉलर-दर-डॉलर शुल्क लादण्यात कॅनडा किती पुढे जाऊ शकतो याची मर्यादा असल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर कॅनडा अमेरिकेसोबत एक नवीन आर्थिक आणि सुरक्षा संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा