ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, हिंदुस्थानातील 5 राज्यातील विद्यार्थ्यांवर घातली बंदी

ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, हिंदुस्थानातील 5 राज्यातील विद्यार्थ्यांवर घातली बंदी

डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम कडक केले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाकडे दुसरा पर्याय म्हणून पाहत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानमधील पाच राज्यातील विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे.

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना कठोर पाऊल उचलत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातसह जम्मू-कश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या अर्जावर कडक निर्बंध लादले आहेत. बनावट स्टुडंट व्हिसा अर्जाद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळवून हे विद्यार्थी पूर्णवेळ काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील फेडरेशन युनिव्हर्सिटी, वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी, व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी आणि सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित विद्यापीठांनी या पाच राज्यातील विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी थांबवली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पाच राज्यांवर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती, मात्र मध्यंतरी काही नियम शिथिल करण्यात आले होते. परंतु व्हिसाचा गैरवापर वाढल्याने पुन्हा एकदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने प्रदेश आधारित बंदीला आपण मान्यता देत नाही असे म्हटले आहे. मात्र विद्यापीठांना त्यांचे स्वत:चे प्रवेश धोरण ठरवण्याची मान्यता असल्याचे म्हणत एक प्रकारे याला मान्यताच दिली आहे. दुसरीकडे असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन एज्युकेशन रिप्रेझेंटेटिव्ह्ज इन इंडियाने मात्र हा निर्णय भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा