पहलगाम हल्ल्याच्या 5 दिवसांनीच अतुल कुलकर्णी पोहोचला काश्मीरमध्ये; पाठ फिरवणाऱ्यांना खास आवाहन
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन याठिकाणी 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले. पहलगामच्या या घटनेनंतर अनेक पर्यटकांनी ऐन पर्यटनाच्या काळात काश्मीरकडे पाठ फिरवली आहे.
दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरला जायला अनेकजण घाबरत आहेत. पुन्हा कधीच काश्मीरला जाणार नाही, असं काहीजण म्हणतायत. अशातच अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी स्वत: काश्मीरला जात मोठा संदेश दिला आहे.
मुंबई ते श्रीनगरला प्रवास करताना अतुल कुलकर्णी यांनी विमानातील फोटो पोस्ट केला आहे. काश्मीरमध्ये एप्रिल-मे महिन्यात पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. परंतु हल्ल्यानंतर विमानातही शुकशुकाट पहायला मिळतोय. नेहमी हे विमान प्रवाशांनी भरलेलं असतं, अशी माहिती क्रू मेंबरने अतुल यांना दिली. या जागा आपल्याला पुन्हा भरायच्या आहेत, असं त्यांनी या फोटोवर लिहिलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List