दहशतवाद्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, लष्करप्रमुख आणि राज्यपालांनी बैठकीत घेतला सुरक्षेचा आढावा

दहशतवाद्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, लष्करप्रमुख आणि राज्यपालांनी बैठकीत घेतला सुरक्षेचा आढावा

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये पोहोचले. त्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि द्विवेदी यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू- कश्मीरमधील परिस्थितीचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवाद्यांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे सिन्हा आढावा बैठकीत म्हणाले. यावेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

सुरुवातीला कमांडर्सनी लष्करप्रमुख द्विवेदी यांना एलओसीवरील सुरक्षा आणि कश्मीरमधील परिस्थिती याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करतानाच दहशतवादाचे पूर्ण जाळे आणि त्यांच्या आर्थिक नाड्याच उद्ध्वस्त करण्यास मनोज सिन्हा यांनी द्विवेदी यांना सांगितले. दरम्यान, लष्करप्रमुख जम्मू-कश्मीरमध्ये असताना पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया “2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील...
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द
मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी