IPL 2025 – धोनी चारसौ पार

IPL 2025 – धोनी चारसौ पार

हैदराबादविरुद्ध नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच महेंद्रसिंह धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 400 सामने खेळण्याचा पराक्रम केला. तो रोहित शर्मा (356), दिनेश कार्तिक (412) आणि विराट कोहलीनंतर (407) 400 टी-20 सामने खेळणारा चौथा हिंदुस्थानी ठरला. क्रिकेटविश्वातला तो 24 वा क्रिकेटपटू आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ यष्टीच्या मागे आणि पुढे आपला करिष्मा दाखवणाऱया धोनीच्या विक्रमांच्या यादीत आज आणखी एका विक्रमाची नोंद झाली. आयपीएलचे सर्वच्या सर्व 18 मोसम खेळणारा धोनी आतापर्यंत 273 सामने खेळला आहे. तसेच 98 आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्याने आपला खेळ दाखवला असून उर्वरित 29 सामने अन्य टी-20 स्पर्धांत खेळला आहे. त्याने आपल्या दोन दशकांच्या दीर्घ कारकीर्दीत टी-20 क्रिकेटमध्ये 2007 चे वर्ल्ड कप, चेन्नईसाठी आयपीएलचे पाचवेळा आणि दोनदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले आहे. धोनीने आपल्या टी-20 कारकीर्दीत 7566 धावा आणि यष्टीमागे 318 विकेट टिपल्या आहेत. धोनीने आज 400 वा सामना खेळण्याचा विक्रम रचला असला तरी सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडीजच्या कायरन पोलार्डच्या (695) नावावर आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया “2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील...
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द
मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी