पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल

पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल

पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्यासाठी शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाची बैठक झाली. याबाबत 3 टप्प्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली. सी.आर. पाटील म्हणाले की, “याबाबत तीन प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जलशक्ती मंत्री सीआर पाटील सहभागी झाले होते. 3 टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या रणनीतींबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 23 एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानला पत्र पाठवून हिंदुस्थानने याबाबत अधिकृत माहिती दिली. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर
उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो,...
एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने
कलाकारांच्या उपस्थिती मुंबईत रंगला ‘लाडकी बहीण चषक’; जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरस
तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला
हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय, 18 वर्षात पहिल्यांदाच भेदला चेपॉकचा अभेद्य गड
Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल