सिंधू नदी आमचीच! खोऱ्यात एकतर आमचं पाणी वाहेल किंवा त्यांचं रक्त, बिलावल भुट्टोंची हिंदुस्थानला पोकळ धमकी
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी (22 एप्रिल) रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली. या हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले. केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द करत पाकिस्तानचे नाक दाबले. हिंदुस्थानच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची चांगलीच टरकली आहे. अशातच माजी परराष्ट्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावर भुट्टो झरदारी यांनी हिंदुस्थानला पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; आयईडी स्फोटाने पाकिस्तानी सैन्याचा ताफा उडवला, 10 सैनिक ठार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List