दिल्लीत चाललंय काय? आणखी एका न्यायाधीशांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

दिल्लीत चाललंय काय? आणखी एका न्यायाधीशांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

अलिकडेच दिल्लीच्या एका न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांना उघडपणे धमकी दिली होती. चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर एका आरोपीने आणि त्याच्या वकिलाने न्यायालयातच एका महिला न्यायाधीशाला धमकावले आणि शिवीगाळ केली होती. यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा एका न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. येथील द्वारका न्यायालयाच्या न्यायाधीशांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल रोजी द्वारकेतील काक्रोला गावात दोन अज्ञात व्यक्तींनी न्यायाधीशांना धमकी दिली होती.

याप्रकरणी 16 एप्रिल 2025 रोजी एफआयआर दाखल करण्यात आली. या एफआयआरनुसार, न्यायाधीशांनी आरोप केला की, 1 एप्रिल रोजी न्यायाधीश संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून एका सार्वजनिक शाळेकडे जात होते. यावेळी कारमधून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या मागे 10 मीटर अंतरावर वाहन थांबवले आणि चार ते पाच वेळा हॉर्न वाजवला.

या प्रकरणी पोलिसात नोंदवलेल्या एफआयआरनुसार न्यायाधीशांनी आरोप केला आहे की, “मी मागे वळून पाहिले तेव्हा वाहनात दोन व्यक्ती होते. त्यातील ड्रायव्हर माझ्यावर ओरडून म्हणाला की, ‘तू वाचून राहा, आम्ही थेट गोळ्या घालू. जगायचे असेल तर कमी बोल.’ धमकी दिल्यानंतर ते पसार झाले.” एफआयआरनुसार, न्यायाधीशांनी सांगितले की, त्यांनी वाहनाची नंबर प्लेट पाहिली नाही. दरम्यान, पोलीस या दोन्ही अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर उन्हाळ्यात ‘या’ तीन प्रकारचे चविष्ट कांजी प्या, आरोग्यासाठीही फायदेशीर
उन्हाळ्यात हेल्दी राहण्याकरिता जीवनशैलीबरोबरच योग्य आहाराची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो,...
एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने
कलाकारांच्या उपस्थिती मुंबईत रंगला ‘लाडकी बहीण चषक’; जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरस
तुमच्या ‘या’ सवयीमुळे खराब होईल तुमचे लिव्ह, त्या आजच बदला
हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय, 18 वर्षात पहिल्यांदाच भेदला चेपॉकचा अभेद्य गड
Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल