डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी

डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी

ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि वातावरणातील बदल यामुळे यंदा आंबा उत्पादनावर संकट कोसळले असून डहाणू व तलासरी भागातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळांना कागदी पिशव्यांचे आवरण लावण्यास सुरुवात केली आहे. या सुरक्षा कवचाने ऊन, वारा, पक्षी आणि कीटकांपासून संरक्षण मिळत आहे. मात्र असे असले तरी खर्चात वाढ होत असल्याने बागायतदारांचे आर्थिक बजेट
कोलमडले आहे.

गेल्या काही दिवसात हवामानात अचानक बदल झाल्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ, तर पहाटे थंडी अशी विषम स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी फळगळ आणि रोगराई वाढू लागली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून कागदी पिशव्यांचा वापर वाढवला जात आहे. डहाणूतील आंबा उत्पादक शेतकरी सुदीप म्हात्रे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले आहे.

फळांचे पोषण टिकून राहते
साध्या कागदी पिशव्या बाजारात फक्त 1 रुपयाला उपलब्ध असून, त्या सहज वापरता येतात. 25-20 सेंमी आकाराच्या या पिशव्या आहेत. या पिशव्या फळांना दवबिंदू, पी, बंद, परमामी आणि कडक उन्हापासून संरक्षण देतात. त्याचबरोबर पिशव्या वापरल्यास फळगळ कमी होते. फळांचा रंग, वजन आणि गोडी वाढते. कीटकनाशक फवारणीची गरज कमी होते. एकसमान रंग निर्माण होतो. फळांचे पोषण टिकून राहते. तसेच सेंद्रिय उत्पादनास चालना मिळते.

पालघर जिल्ह्यात आंबा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी येतात. त्याआधीच पिशव्या चढवल्यास उष्णतेपासून होणारे नुकसान टाळता येते. कागदी पिशव्यांचा वापर हे आंबा उत्पादकांसाठी एक योग्य आणि फायदेशीर पाऊल ठरेल. – प्रशांत जाधव, आंबा उत्पादक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनावर राज्य करतो. अभिनयाव्यतिरिक्त, शाहरुख खान त्याच्या कुटुंबावरील प्रेमासाठी आणि त्याच्या पालकांशी असलेल्या...
नारळाच्या मलईचा हेअर मास्क डॅमेज केसांसाठी ठरेल फायदेशीर, केसांच्या समस्या होतील दुर
Jammu Kashmir – काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट जारी
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याची मोठी कारवाई, पाच दहशतवाद्यांची घरे ब्लास्ट करुन केली उद्ध्वस्त
Latur News – चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक कठड्याला धडकून उलटला; 12 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू, 40 जखमी
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार मुर्दाबाद…; परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या
Mumbai News – अंधेरीतील इमारतीला भीषण आग; महिलेचा मृ्त्यू तर, सहाजण जखमी