आयपीएल राऊंडअप – …तर इशानला मैदान सोडावे लागले नसते

आयपीएल राऊंडअप – …तर इशानला मैदान सोडावे लागले नसते

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात इशान किशन विचित्र पद्धतीने बाद होण्याचा प्रकार अनेकांना खटकलाय.  हिंदुस्थानचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना इशानने थोडा संयम बाळगायला हवा होता. त्याला मैदान सोडावे लागले नसते, असे परखड मत व्यक्त केले. डीआरएसचा पर्याय उपलब्ध असतानाही इशानचे डीआरएस न घेता मैदान सोडणे सर्वांना खटपू लागलेय. त्याने मैदानावरील पंचांवर निर्णय सोडायला हवा होता. कारण त्यांनाही त्यांच्या कामाचे पैसे दिले जातात, असेही सेहवाग म्हणाला.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 41 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज इशान किशनला बाद देण्याच्या निर्णयावरून वाद पेटला आहे. फलंदाजी करताना इशान पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदानाबाहेर गेला. मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इशान किशनला लेग साईडवर एक चेंडू टाकला, जो बॅटच्या अगदी जवळून गेला. मात्र, मुंबईच्या खेळाडूंनी झेलबाद झाल्याबद्दल अपीलही केले नव्हते. मात्र, पंचांनी अर्धा हात वर केला. त्यानंतर चहरने अपील केल्यानंतर पंचांनी इशानला बाद घोषित केले. त्यानंतर इशानने आपला प्रामाणिकपणा दाखवत केलेला मूर्खपणा न पटणारा आहे. जर चेंडू बॅटला लागला असता तर ते समजण्यासारखे होते, कारण असे करणे खेळाच्या भावनेनुसार झाले असते. पण चेंडू लागला नसतानाही आणि पंचांना खात्री नसतानाही मैदान सोडून जाणे योग्य नव्हते, असे सेहवाग म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया “2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील...
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द
मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी