संतापजनक; मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्र सरकारने ठरवला ‘अडथळा’!

संतापजनक; मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी  महाराजांचा पुतळा केंद्र सरकारने ठरवला ‘अडथळा’!

छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबई विमानतळावरील तेजस्वी पुतळा केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ‘अडथळा’ ठरवून नोटीस बजावल्याने शिवप्रेमींसह अवघ्या महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा पुतळा 2016 मध्ये विमानतळाचे नूतनीकरण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ विमानतळ प्रशासनाकडूनच उभारण्यात आला आहे.

‘डीजीसीए’च्या माध्यमातून मुंबईच्या फनेल झोन परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये झोपड्या, इमारतींची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणानंतर अडथळा ठरणाऱया सर्व इमारतींना विमानतळ प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ालाही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • ज्या वेळी विमानतळाचे नूतनीकरण झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने हा पुतळा उभारला होता त्या वेळी जीव्हीके कंपनीकडे विमानतळाचे व्यवस्थापन होते. विमानतळाचे व्यवस्थापन अदानीकडे आल्यानंतर आता थेट शिवरायांचा पुतळा हटवण्याचे कारस्थान सुरू झाले आहे. डीजीसीएच्या नोटीसने त्याचा पर्दाफाश झाला आहे.

पुतळा हटवू देणार नाही

फनेल झोनच्या नावाखाली सांताक्रुझ-पार्ल्यातील रहिवाशांना बेघर करण्यासाठी केंद्र सरकारला हाताशी धरून अदानीकडून हे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे, मात्र आम्ही पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱयांनी घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया “2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील...
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द
मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी