MNS : हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेनं ठरवलं, आर-पार, ‘टोकाला जाईपर्यंत संघर्ष’,

MNS : हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेनं ठरवलं, आर-पार, ‘टोकाला जाईपर्यंत संघर्ष’,

हिंदी भाषा शिकणं बंधनकारक करण्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. “आज हिंदी शिकणं बंधनकारक करत आहात. उद्या बोलाल गुजराती भाषा शिका, परवा बोलाल तामिळ शिका, असं होत नाही, आम्ही आमच्या राज्याची भाषा शिकू. दुसऱ्या राज्याची भाषा आम्ही का शिकायची? हे बंधनकारक करण्याला आमचा विरोध आहे” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

हिंदी भाषेचा निर्णय लागू झाल्यास आपली भूमिका काय असेल? ‘संघर्ष होईल, मराठीत सांगतो टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल’ असं संदीप देशपांडे म्हणाले. “सध्या कोणाला उद्योग नाहीयत, काम नाहीयत. त्यामुळे ते अशा गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत” असं अजित पवार म्हणाले. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, “जर अजित पवारांना हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल, तर त्यांनी पहिलीपासून धडे घ्यावेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवा”

एक देश, एक भाषा कॉन्सेप्ट आली कुठून?

मुख्यमंत्री म्हणाले मराठी भाषा अनिवार्य आहेच, पण हिंदी कम्युनिकेशनच्या दुष्टीने आली पाहिजे. “गरज काय आहे? एक देश, एक भाषा कॉन्सेप्ट आली कुठून? आधीपासून भारतात इतक्या भाषा बोलल्या जात आहेत, आत्ताच गरज काय आहे?. तुमची भाषा तामिळनाडूत समजावी, म्हणून हिंदी आवश्यक नाही” असं संदीप देशापांडे यांनी सांगितलं.

ती विविधता तोडायला निघाला आहात

संवाद व्यवस्थेसाठी सांघिक भाषा असावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर “आपल्या जनगणमन मध्ये म्हटलं आहे, पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा या सर्व गोष्टी एक आल्यावर भारत होतो, मग एक देश, एक भाषा कॉन्सेप्ट आली कुठून?. विविधतेत एकता आहे ना, मग तुम्ही ती विविधता तोडायला निघाला आहात” असं संदीप देशपांडे म्हणाले. घाटकोपरमधील मराठी विरुद्ध गुजराती वादावर म्हणाले की, जिथे मराठीवर अन्याय, तिथे आमची लाथ पडेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा