काय सांगता? टीसीने थांबवून तिकीट विचारलं तर मिळणार 10 ते 50 हजार रुपयांचे बक्षीस, रेल्वेची नवीन योजना

काय सांगता? टीसीने थांबवून तिकीट विचारलं तर मिळणार 10 ते 50 हजार रुपयांचे बक्षीस, रेल्वेची नवीन योजना

लोकलने प्रवास करताना तुम्हाला टीसीने तुम्हाला थांबवून तिकीट विचारलं तर तुम्हाला 10 ते 50 हजार रुपये बक्षीस मिळू शकतं. तुम्हाला हे खोटं वाटेल, पण हे खरं आहे. कारण रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी लकी यात्रा योजना आणणार आहे. प्रवाशांन तिकीट, पास विकत घेऊन प्रवास करावा यासाठी रेल्वे ही योजना आणणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी सरकार स्वतःचे पैसे वापरणार नाहिये.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबई लोकलमधून दररोज 40 लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यापैकी 20 टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. रेल्वे दररोज 4 ते 5 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंड आकारतात.

प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा यासाठी रेल्वेने लकी यात्री योजना आणली आहे. या योजनेनुसार प्रवाशाला जर टीसीने तिकीट विचारलं तर नशीबवान प्रवाशाला 10 हजार रुपये मिळू शकतात. रेल्वेने दिवसाला 10 हजार तर आठवड्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कुणाला बक्षीस द्यायचे याचा निर्णय टीसी घेणार. रेल्वे प्रशासन प्रवाशाची माहिती तपासून घेणार, त्यानंतर या प्रवाशाला हे बक्षीस मिळेल.

मुंबईच्या कुठल्याही स्थानकावर टीसीकडून तिकीट तपासले जातील आणि त्यातून लकी प्रवासी निवडले जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पैसे प्रवाशांच्या खिशातून दिले जाणार नाही. एफसीबी इंटरफेस कम्युनिकेशन कडून ही योजना प्रायोजित केली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून ही योजना दोन महिन्यांपासून राबवली जाईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात ‘तारक मेहता..’मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17-18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय....
पलक तिवारीला अनन्या पांडे म्हणताच तिचा पारा चढला; पापारांझींना चिडून म्हणाली,”तुम्ही दरवेळी…”
Exclusive: दिशा सालियान १४व्या मजल्यावरून पडली तेव्हा अंगावर कपडे… तिघांनी पाहिले
तुमच्या आई-बहिणीचा व्हिडीओ पहा..; कास्टिंग काऊचची क्लिप शेअर करणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री
मोठी बातमी! अभिनेत्री दिशा पटाणीमुळे वाढले होते दिशा सालियानचे टेन्शन, नेमकं काय झालं होतं?
सलमान खानने सरळ हात जोडले अन्… म्हणाला ,’मी खूप वादांमधून गेलोय पण आता….”
विठ्ठलभक्तांना खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित