गोरखपूरमध्ये कालबाह्य शीतपेयांच्या बाटल्या जप्त; अंदाजे 12 लाख किमतीचा माल जप्त!

गोरखपूरमध्ये कालबाह्य शीतपेयांच्या बाटल्या जप्त; अंदाजे 12 लाख किमतीचा माल जप्त!

गोरखपूरमध्ये खोराबार येथील गोदामावर छापा टाकण्यात आला. या गोदामामध्ये थंड पेयांचे बाॅक्स ठेवण्यात आले होते. मुख्य म्हणजे या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट खोडून टाकण्यातही आली होती. कालबाह्य झालेल्या शीतपेयांचे सर्व बाॅक्स यावेळी जप्त करण्यात आले असून, या जप्त केलेल्या मालाची किंमत ही अंदाजे 12 लाख रुपये इतकी आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना सहाय्यक अन्न आयुक्त डॉ. सुधीर कुमार सिंह म्हणाले की, खोराबारमधील जेपी ट्रेडर्सकडे कॅम्पा कोलाचे सी अँड एफ आहे. येथे कालबाह्य झालेले थंड पेये विकल्याची तक्रार मिळाली होती. पथक गोदामात पोहोचल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेले थंड पेये आढळून आली. यातील काही थंड पेये वेगळी ठेवण्यात आली होती आणि काही नवीन बाटल्याही ठेवण्यात आल्या होत्या.

गोदामामध्ये 200 मिली पॅकिंगचे 950 बॉक्स, 500 मिलीचे 670 बॉक्स, 200 मिली ऑरेंज कोल्ड्रिंकचे 1280 बॉक्स, 500 मिली ऑरेंज कोल्ड्रिंकचे 255 बॉक्स कालबाह्य आढळले. स्टॉकची माहिती मागवण्यासाठी ऑपरेटरला नोटीस बजावण्यात आली आहे. परवान्यातही त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने केलेल्या गोपनीय तपासणीत असे उघड झाले आहे की, काही व्यावसायिक सुमारे दीड लाख रुपयांचे लेसर मशीन खरेदी करून कालबाह्यता तारीख बदलत आहेत. ते नागरिकांना कालबाह्य झालेले थंड पेये देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. या तपासणीमध्ये असे दिसून आले आहे की, बहुतेक शीतपेय उत्पादक कंपन्या कालबाह्य झालेल्या शीतपेयांच्या बदल्यात फक्त 50 टक्के पैसे परत करतात. ही रक्कम रोख स्वरूपात नाही तर पाण्याच्या बाटल्यांच्या स्वरूपात दिली जाते. यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होते. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ते कालबाह्य झालेल्या तारखा बदलतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?