ठाण्यातला अंधार हटवण्यासाठी आम्ही उजेड घेऊन आलोय, नाईकांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले

ठाण्यातला अंधार हटवण्यासाठी आम्ही उजेड घेऊन आलोय, नाईकांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले

ठाण्यातला अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहे. उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असे सूचक वक्तव्य करून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे नाईक विरुद्ध मिंधे असा पुन्हा सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोलादेखील लगावला.

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली 72 वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्व. पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा-2025 चे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी नाईक यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. सुरुवातीला ठाण्यातील जनता दरबारावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार घमासान झाले. त्यानंतर नवी मुंबईत 14 गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यावरून नाईकांनी मिंध्यांना थेट अंगावर घेतले होते. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात येऊन मिंधे गटाला आव्हान देण्याची एकही संधी सोडत नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे बोलले जाते.

नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही

वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ठाण्यातील कचरा समस्येविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईत कचऱ्याची समस्या आहे. फक्त आमच्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आणि नियोजन आम्ही केले आहे असे सांगत ठाणे शहरातील कचऱ्याचा प्रश्नावर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पालिकेवर टीका केली. तसेच ठाणे जिल्ह्याचा मी तीन वेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला विचारला आहे....
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका