वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा, युवासेनेच्या वतीने मागणी; कणकवली पोलिसांना दिले निवेदन

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा, युवासेनेच्या वतीने मागणी; कणकवली पोलिसांना दिले निवेदन

मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशी बेताल वक्तव्य करतात, पण नितेश राणे यांच्या भडखाऊ भाषणांमुळे राज्यातील युवक भडकले जात आहेत. तरुणांची नितेश राणेंच्या भडखाऊ भाषणांमुळे दिशाभूल होत आहे. मंत्री पदावर राहून असंवेदनशील वक्तव्य करत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी युवासेनेच्यावतीने कणकवली पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे रोजगार, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल मंत्री राणे हे कधी बोलत नाहीत. पण रोज सकाळी उठून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव कायम करत असतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगार, ठेकेदार यांची देणी बाकी आहेत त्याबद्दल राणे कधीच बोलताना दिसून येत नाहीत. राज्यातील युवकांची बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता यावर नितेश राणे कधी भाष्य करताना दिसून येत नाहीत, यावरून नितेश राणे यांना शांत असलेले राज्य हे अशांततेच्या मार्गांवर घेऊन जायचे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो, रोज उठून अशी भडखाऊ वक्तव्य करून दंगली घडवण्याच्या यांचा उद्देश असेल तर अश्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवासेनेच्यावतीने पोलिसांमार्फत करण्यात आली आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, गुरु पेडणेकर, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, मंगेश राणे, अविनाश सावंत, आशिष मेस्त्री, चेतन गुरव उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?