कोहली, शर्मा आणि जडेजा ग्रेड A+ करारांमधून बाहेर पडणार?

कोहली, शर्मा आणि जडेजा ग्रेड A+ करारांमधून बाहेर पडणार?

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाने (BCCII) या वर्षी वार्षिक करारांची यादी जाहीर केलेली नाही आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे त्यांच्या ग्रेड A+ करारांमधून बाहेर पडू शकतात. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ग्रेड A+ करारांमध्ये प्राधान्य दिले जाते आणि या तिघांनी T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने गुंतागुंत वाढली आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की हे करार सामान्यतः इंडियन प्रीमियर लीग (IPL) आधी जाहीर केले जातात परंतु BCCI ने चॅम्पियन्स ट्रॉफी संपेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्याने तिघेही करारांच्या प्रथम श्रेणीत कायम राहू शकतात. ग्रेड A+ करार असलेला दुसरा एकमेव क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे परंतु त्याच्या बाबतीत कोणतीही अडचण आता तरी दिसत नाही.

रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, गेल्या वर्षी शिस्तभंगाच्या कारवायांमुळे दुर्लक्षित झाल्यानंतर श्रेयस अय्यरला यावेळी संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि घरच्या मैदानांवर त्याची कामगिरी निश्चितच उजवी ठरेल.

‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितच्या निर्णयाची बोर्ड वाट पाहिल. जर त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तर बोर्ड काय करायचे ते पाहेल. जुलैमध्ये त्याने टी-20 वर्ल्डकप जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने चांगले नेतृत्व केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही’, अशी माहिती एका सूत्राने दिल्याचे TOI च्या वृत्तात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त...
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग