युद्धाचे ढग… तैवानजवळ 59 चिनी लढाऊ युद्धनौका तैनात

युद्धाचे ढग… तैवानजवळ 59 चिनी लढाऊ युद्धनौका तैनात

बलाढय़ चीनला आव्हान देण्यासाठी तैवानने पाच दिवसांचा रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम्स अर्थात जलद प्रतिक्रिया सराव सुरू केला आहे. चीनकडून वाढत्या लष्करी धोक्याच्या पार्श्वभूमीवर तैवानने हे पाऊल उचलले आहे. चीनने कोणत्याही क्षणी हल्ला केल्यास त्वरित कारवाई करण्याचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जात आहे. चीनने अलीकडेच तैवानभोवती 59 चिनी लढाऊ युद्धनौका तैनात केल्या आहेत. याशिवाय चीनने यास तैवानच्या स्वातंत्र्य समर्थक धोरणांसाठी ही शिक्षा असल्याचे म्हटले आहे. चीन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तैवानवर बळजबरीने ताबा मिळवण्याची धमकी देत असताना तैवानने हा सराव सुरू केला आहे. विशेष म्हणजे जर तैवानने स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले तर लष्करी कारवाई केली जाईल, या इशाऱ्याचा पुनरुच्चार चीनने केला.

सुरक्षा मजबूत करण्याची आवश्यकता

चीनचे सैनिक आधीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करू शकतात. त्यामुळे आपल्याला अधिक तयार राहावे लागेल. चीनच्या लष्करी कारवाया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहेत. आम्हाला आमची सुरक्षा आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे, असे तैवानचे संरक्षण मंत्री चिउ कुओ-चेंग यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?