Benefits Of Raw Onion- उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खा, शरीराला मिळतील खूप सारे फायदे! वाचा सविस्तर

Benefits Of Raw Onion- उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खा, शरीराला मिळतील खूप सारे फायदे! वाचा सविस्तर

आपल्यापैकी अनेक कुटूंबांमध्ये कांद्याशिवाय एखादा पदार्थ करायचा म्हटला की, विचार येतो आता नेमकं करायचं तरी काय.. हिंदुस्थानातील स्वयंपाक घरांमध्ये कांद्याशिवाय स्वयंपाक अपूर्णच मानला जातो. अर्थात याला काही स्वयंपाकघर अपवाद आहेत. कांद्याचे आपल्या आहारातील महत्त्व हे खूप अबाधित आहे. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कांदा केवळ चव वाढवत नाही तर पोषक तत्वांनीही समृद्ध असतो. दुपारच्या जेवणात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

 

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे?

उन्हाळ्यात गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या अनेकदा उद्भवू शकतात. कच्चा कांदा पचनक्रिया सुधारतो. त्यात भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असते. त्यामुळे आपले पोट स्वच्छ होते. कांदा खाण्यामुळे आपली पचनसंस्था मजबूत होते.

 

कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळते.

 

कांद्यामध्ये सल्फर आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी फायदेशीर असते. त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत होते तसेच मुरुम येण्यापासून रोखते. उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. पण कच्चा कांदा खाल्ल्यामुळे त्वचा निरोगी राहते.

 

कच्चा कांदा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यात क्रोमियमसह इतर घटक असतात, जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते, कारण ते इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. तुमच्या आहारात कच्चा कांदा न विसरता खाण्यास सुरुवात करा.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?