Somnath Suryawanshi Case – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल

Somnath Suryawanshi Case – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल

परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी कुटुंबीयांनी केला होता. पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला होता. मात्र आता न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल समोर आला असून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचे यात म्हटले आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युला पोलीसच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेत आयोगाने सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे), परभणी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक यांनाही नोटीस बजावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार
Water Taxi in Mumbai: मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी...
धारावीची एक इंचही जागा अदानी यांना देणार नाही; शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
माझ्याशी नीट वागायचं… हॅशटॅग ठेवत सुषमा अंधारे यांचा कुणाला रोखठोक इशारा?
औरंगजेबाची कबर हटवा, उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने आयोजित ग्रामीण शिक्षक प्रशिक्षण वर्ग, 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांचा सहभाग
जग अंतराळात वाटचाल करत आहे, तुम्ही कबरी खोदण्यात व्यग्र आहात, संजय सिंह यांची मोदी सरकारवर टीका
औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?