Pune News – चालत्या गाडीमधून मित्रालाच दिले फेकून, बीडच्या तरुणांचा पुण्यात प्रताप

Pune News – चालत्या गाडीमधून मित्रालाच दिले फेकून, बीडच्या तरुणांचा पुण्यात प्रताप

मद्यधुंद अवस्थेत असताना गाडी चालवायला दे, असे म्हणत मालकालाच चालत्या गाडीतून फेकून दिल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे घडला. तसेच सदर गाडी अडवताना काही जण गंभीर जखमी झाले असून तीन व्यक्ती गाडी घेऊन फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कड या गावताली चार व्यक्ती बारामती येथे पोलिसांनी पकडलेले वाहन सोडवण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन आले होते. मात्र पोलिसांनी वाहन सोडले नाही. त्यानंतर बारामतीमध्ये मद्यप्राशन करून हे चौघे भवानीनगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणार होते. गाडीचा मालक सुद्धा मद्यधुंद अवस्थे होता. यावेळी गाडीतील एका व्यक्तीने गाडी मला चालवायला दे, अस म्हणच चक्क गाडी मालकालाचा गाडीतून बाहेर फेकून दिले. त्यानंतर गाडीच्या मालकाने सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या कंपनीच्या कामगारांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरुन गाडीचा पाठलाग केला, परंतु दुचाकीवरच गाडी घातल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तर मद्यधुंद अवस्थेत गाडी घेऊन सदर व्यक्ती या भिगवनच्या दिशेने गेल्या आहेत. भवानी नगरच्या नातेवाईकांना कळल्यानंतर हे धावत त्या ठिकाणी गेले व जखमी झालेल्या मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजित पवारांच्या घरी लवकरच सनई चौघडे अजित पवारांच्या घरी लवकरच सनई चौघडे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव...
मला बाहेर बोलायचीही आता चोरी झालीय
निजामुद्दीन गोवा एक्प्रेसला आता जेजुरीत थांबा
देहूनगरीत उद्या रंगणार बीज सोहळा
बुलढाण्यात पाण्यासाठी बळीराजाचे बलिदान, महायुती सरकारला जबाबदार धरत कैलास नागरे या शेतकऱ्याने जीवन संपवले
होळी रे होळी… बजेटची होळी! मुंबई–ठाण्यात मटणासाठी दोन तासांची रांग, एका किलोला 840 रुपयांचा भाव
देवाची कृपा; महाराष्ट्रात कायदा कुव्यवस्था, बीडच्या निलंबित पोलिसांसोबत न्यायमूर्तींची धुळवड