होळी रे होळी… बजेटची होळी! मुंबई–ठाण्यात मटणासाठी दोन तासांची रांग, एका किलोला 840 रुपयांचा भाव

होळी रे होळी… बजेटची होळी! मुंबई–ठाण्यात मटणासाठी दोन तासांची रांग, एका किलोला 840 रुपयांचा भाव

मुंबईसह राज्यभरात होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी होत असली तर प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडले आहे. होळी स्पेशल पुरणपोळ्या बनवण्यासाठी लागणारे तेल, तूप, चणाडाळ, मैदा, गूळ, आणि वेलचीच्या दरांमध्ये तब्बल 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. तर सर्वांच्या पसंतीचे मटण आणि चिकनचीही किंमत वाढल्याने ‘होळी’चा बेत यंदा चांगलाच महागात पडला. कालपर्यंत 700 रुपये असलेला मटणाचा किलोचा भाव आज थेट 840 रुपये झाला.  तरीही मुंबई-ठाण्यात मटणासाठी लांबच लांब रांगा लागल्या. किमान दोन तास रांगेत उभे राहावे लागत होते.

अशा वाढल्या किमती

  • गतवर्षी 80 रुपये असणारा गूळ यावर्षी 100 रुपयांवर पोहोचला. तर चणाडाळ 75 रुपयांवरून 85 ते 90 रुपयांवर गेली.
  • वेलचीचा भाव 25 ते 30 रुपये तोळ्यावरून 40 ते 50 रुपयांपर्यंत वाढला.
  • मैदा 15 ते 20 रुपयांवरून 50 ते 60 रुपयांवर गेल्याने तयार पुरणपोळीची किंमतही वाढली.
  • एक लिटर दुधाची किंमत मुंबईत सुमारे 85 रुपयांवरून थेट 98 झाल्याने दुग्धजन्य पदार्थांची किंमत वाढली.
  • गतवर्षी सुमारे 140 ते 160 पर्यंत असणारी एक लिटर तेलाच पिशवी 185 वर पोहोचली.

उल्हास नदीत बुडून  चार मुलांचा मृत्यू

बदलापुरात रंगाचा बेरंग झाला. रंग खेळल्यानंतर उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे बदलापूरच्या चामटोली गावावर शोककळा पसरली आहे. ही सर्व मुले पोद्दार सोसायटीमध्ये राहणारी होती. आर्यन सिंग (15) या मुलाला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकताच आर्यन मेडर (16), सिद्धार्थ सिंग (16), ओम सिंग (15) हे मित्र मदतीसाठी सरसावले. मात्र चौघांचाही बुडून मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ? पुण्यात उष्णतेचा पारा 40 पार, मुंबईत उकाडा वाढणार की कमी होणार ?
उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यातच आता...
सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा, मटणालाच नाही तर दुधाला दरवाढीची उकळी, ग्राहकांचा खिशावर बोजा
आधी ‘जब वी मेट’साठी करीना नाही म्हणाली, पण ‘या’ व्यक्तीने मनवताच तयार झाली
आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर पार्टीत एकत्र, तमन्ना भाटिया- विजय वर्माचा व्हिडिओ पाहाच
या सुपरस्टारच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू, 10 वर्षे वाट पाहिली, 53 व्या वर्षीही एकटी
Aamir Khan : इरफान पठाणच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठीही आमिर-गौरी दिसले एकत्र ! Video व्हायरल
पार्किंगच्या वादातून मारहाण; शास्त्रज्ञाचा मृत्यू, बहिणीने किडनी देऊन वाचवला होता जीव